टीम इंडियाच्या विजयाने सानिया खुश

बर्मिंगहॅम- भारत-पाक संघातील सामना म्हटला की उत्सुकता शिगेला पोहचतो. दोन्ही देशातील प्रशसक सामना कोण जिंकणार याची उत्सुकता लागलेली असते. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा भारताच्या विजयाने खुश झाली आहे. पाक टीमसोबत असल्यावरही मी टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केली. भारताने विजय मिळवावा आणि माझ्या पतीने धावा काढाव्या, हाच माझा फंडा आहे, असेही तिने सांगितले. मात्र, शोएबला भारताविरुद्ध अवघ्या १७ धावा काढता आल्या.

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सुमार कामगिरीमुळे शोएब मलिकवर टीकास्त्र सोडले जात आहे. त्याने एकूण तीन सामन्यांत अवघ्या २५ धावा काढल्या आहेत. त्याने विंडीजविरुद्ध ०, आफ्रिकेविरुद्ध ८ आणि भारताविरुद्ध १७ धावा काढल्या. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झामुळे आता नुकतीच पाक संघात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. सानिया हॉटेलमध्ये शोएब मलिकसोबत राहिल्याने वाद निर्माण झाला आहे. याच हॉटेलमध्ये पाकचा पूर्ण संघ थांबलेला होता.

पीसीबीने खेळाडूंना पत्नीसोबत हॉटेलमध्ये थांबण्यास सक्त मनाई केली आहे. या नियमाचे उल्लंघन करून शोएब सानियासोबत हॉटेलमध्ये थांबला. या वेळी कोच व्हॉटमोर यांची पत्नीदेखील याच हॉटेलमध्ये थांबली होती. सपोर्ट स्टाफच्या ज्युलियन फर्नांडोच्या मैत्रिणीचेदेखील हॉटेलमध्ये येणे-जाणे सुरू होते. या सर्व प्रकरणामुळे वादात वाढ झाली आहे.

Leave a Comment