टीम इंडियाकडून पाकिस्तानचा धुव्वा

एजबॅस्टन: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पधेतील प्रतिष्ठेच्या लढाईत टीम इंडियाने पाकिस्तानचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या उपांत्य फेरीतील प्रवेशाचा आनंद द्विगुणित केला. पावसाच्या अडचणीनंतर टीम इंडियाने या सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला धूळ चारली.

बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनवरच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणा-या पाकिस्तानचा डाव ३९ षटके आणि चार चेंडूंत अवघ्या १६५ धावांत भारतीय गोलंदाजांनी गुंडाळला.या सामन्यात वारंवार आलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे भारतासमोर विजयासाठी २२ षटकांत १०२ धावांचे आव्हान होते. टीम इंडियाने विजयासाठीचे ते लक्ष्य दोन विकेट्स गमावून अवघ्या षटकांत गाठले.

टीम इंडियातर्फे सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक ४८ धावा केल्या. तर रोहित शर्माने १८ आणि विराट कोहलीने नाबाद २२ धावा केल्या. तीन ते चार वेळा पावसाच्या आलेल्या अडचणीनंतर टीम इंडियाने या सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला धूळ चारली.

Leave a Comment