ऋतुपर्णो घोष यांचे निधन

कोलकाता, दि.30 – राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि अभिनेते ऋतुपर्णो घोष यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. घोष हे गेल्या अनेक दिवसांपासून ते स्वादुपिंडाच्या आजारानेही त्रस्त होते. घोष यांनी बंगाली आणि हिंदीमध्ये यशस्वी चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे. अबोहोनम’ या बंगाली चित्रपटासाठी त्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. घोष यांच्या कारकिर्दीला जाहिरात क्षेत्रापासून सुरुवात झाली. यानंतर ते चित्रपटसृष्टीकडे वळाले. ऋतुपर्णो यांनी 19 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यामध्ये त्यांनी तब्बल 12 राष्ट्रीय पुरस्कार पटकावले.

घोष यांचा हीरेर अंगती’ म्हणजेच हिर्‍याची अंगठी हा पहिला चित्रपट 1194 साली प्रदर्शित झाला. त्याच वर्षी त्यांनी केलेल्या उन्नीशे अप्रैल’ सिनेमाला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला. समीक्षकांनीही घोष यांच्या चित्रपटांचे भरभरून कौतुक केले आहे. त्यामुळेच ते एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून परिचीत होते. दहन’, उत्सव’, चोखेर बाली’, रेलकॉट’, दोसोर’, द लाल्ट लियर’, शोब चरित्रो कल्पोनिक’ आणि अबोहोमन’ या चित्रपटांनी पुरस्कारांवर मोहर उमटवली. बॉलिवूडमध्ये ऋतुपर्णो यांनी अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत रेनकोर्ट हा सिनेमा केला आहे.

Leave a Comment