कान्समध्ये मल्लिकाचे बोल बच्चन

मल्लिका शेरावतने आपल्या बोल्डनेसच्या जोरावर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही काही सिनेमे मिळवले. पण, आता कान्स फेस्टिवलव्यतिरिक्त तिची कुठेच दखल
घेतली जात नसल्यामुळे आता मल्लिकाने पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करायला सुरूवात केली आहे.

कान्स फेस्टिव्हलच्या विशेष कार्यक्रमात मल्लिकाने भारतीय लोक अत्यंत ढोंगी आणि प्रतिगामी असल्याची टीका केली. भारत हा देश महिलांसाठी अजिबात
सुरक्षित नसल्याचं मल्लिका शेरावतने यावेळी म्हटले, मला भारतात राहायला फारसं आवडत नाही. म्हणून मी अर्ध्याहून अधिक काळ लॉस अँजेलिसला असते.
तिथे मी स्वातंत्र्य उपभोगते. भारताला स्त्रियांची प्रगती नको आहे.

स्वतंत्र विचारांच्या महिलांसाठी भारत देश योग्य नाही असं मल्लिका शेरावत या समारंभात म्हणाली. मल्लिका शेरावत यापूर्वी अनेकदा वादग्रस्त वक्तव्यं
करून चर्चेत राहिली आहे. गेले काही महिने तिचे बॉलिवूडमध्ये सिनेमे हिट होत नाहीत. त्यामुळे चर्चेत राहाण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करण्याचा मार्ग मल्लिकाने पुन्हा अवलंबला. मात्र जागतिक स्तरावरील समारंभात भारताबद्दल असं विधान करून मल्लिकाने भारतीयांची नाराजीच ओढावून घेतली आहे.

Leave a Comment