श्रीशांतच्या जीवनावर बनतोय मल्याळी सिनेमा

नवी दिल्ली दि.२१ – आयपीएल ६ सिरीजमध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळणारे श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंदेला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सापडल्याने सध्या देशात एकच चर्चा सुरू झाली आहे. क्षणाचा मोह आयुष्याचा नाश करण्यास कसा कारणीभूत ठरतो हेच या तिघांच्या वर्तनातून स्पष्ट झाले आहे आणि हाच मेसेज घेऊन मल्याळी चित्रपटसृष्टीतील शाजी कैलास आणि ए.के.साजन श्रीशांतच्या जीवनावर – क्रिकेट – याच नावाचा चित्रपट बनविणार आहेत. चित्रपटाची कथा साजन लिहिणार असून दिग्दर्शन शाजी करणार आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना शाजी म्हणाले की श्रीशांतच्या केसमध्ये युवा क्रिकेटपटूंचा रोलमॉडेल असलेला श्रीशांत क्षणिक मोहाला बळी पडला आहे आणि त्यामुळे त्याचे सर्व आयुष्यच बरबाद झाले आहे. ही वेळ त्याच्यावर लालसेमुळेच आली असून त्याला तोच सर्वस्वी जबाबदार आहे. आजची पिढी मटेरियालिस्टीक बनली आहे आणि ध्येय प्राप्तीसाठी गैरमार्गाचा वापर करू धजते आहे मात्र त्यामुळे आयुष्याची वाट लागते हा संदेश देण्यासाठीच हा चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment