
नवी दिल्ली दि.२१ – आयपीएल ६ सिरीजमध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळणारे श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंदेला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सापडल्याने सध्या देशात एकच चर्चा सुरू झाली आहे. क्षणाचा मोह आयुष्याचा नाश करण्यास कसा कारणीभूत ठरतो हेच या तिघांच्या वर्तनातून स्पष्ट झाले आहे आणि हाच मेसेज घेऊन मल्याळी चित्रपटसृष्टीतील शाजी कैलास आणि ए.के.साजन श्रीशांतच्या जीवनावर – क्रिकेट – याच नावाचा चित्रपट बनविणार आहेत. चित्रपटाची कथा साजन लिहिणार असून दिग्दर्शन शाजी करणार आहेत.