फेसबुकवरील तक्रारीचा असाही परिणाम

 मदुराई, दि.१५ -फेसबुकवरून ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर वीज मंडळात काम करणार्‍या एका अधिकार्‍याला लाचेची रक्कम परत करावी लागल्याची घटना तामीळनाडूत घडली.

यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीजेच्या नव्या कनेक्शनसाठी एका अधिकार्यातने लाच घेतल्याची तक्रार १० ग्राहकांनी मदुराईचे जिल्हाधिकारी अंशुल मिश्रा यांच्या फेसबुक पेजवर केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकार्यांकनी वीज मंडळाच्या संबंधित अधिकार्‍याला पाचारण केले. मिश्रा यांनी कानउघाडणी केल्यानंतर संबंधित अधिकार्‍याने लाच घेतल्याची कबुली दिली. त्यामुळे मिश्रा यांनी त्याला लाचेची रक्कम तातडीने परत करण्याचा आदेश दिला.

Leave a Comment