अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण

बॉलीवुडची लोकप्रिय जोडी असलेल्या अभिषेक-ऐश्वर्या यांच्या लग्नाला शनिवारी सहा वर्ष पूर्ण झाली. या जोडीच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विशेषता सिनेसृष्टीतील त्यांच्या सहकार्यांनी फुलांचा बुके देऊन मनोमन शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री बिपाशा बसुने ट्विटरवर या जोडीला लग्नाच्या वाढदिवसानिमित अभिनंदन केले. बिपाशा म्हणाली, ‘जूनियर बच्चन (अभिषेक) आणि ऐश्वर्याची जोड़ी खूबसूरत आहे. आगामी काळात ते एकत्रित राहावेत अशा मनोमन शुभेच्छा दिल्या.’ ऐश्वर्या आणि अभिषेकने २० एप्रिल २००७ रोजी हिंदू रीति रिवाजानुसार लग्न केले होते. बॉलीवुडच्या या खूबसूरत जोडीला १६ नोव्हेबर २०११ साली एक मुलगी झाली आहे. तिचे नाव आराध्या असे ठेवले आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेकने त्यांचा लग्नाचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला. यानिमित्त त्यांनी पार्टीचे आयोजन केले नव्ह्ते. गेल्या काही दिवसापासून अभिषेक कामात व्यस्त असल्याने त्यांनी लग्नाचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले होते. मात्र लग्नाचा वाढदिवसानिमीत त्यांना अनेक जणांनी मनोमन शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment