चांगला खेळ करायला हवा-पाँटिंग

जयपूर – गेल्या काही सामन्यात आम्ही चांगली सलामी देऊ शकलेलो नाही. आगामी काळात मला तसेच सचिन तेंडुलकरच्या खराब फॉर्ममुळे संघाच्या कामगिरीवर ​ विपरीत परिणाम होत असून आम्हाला आता चांगला खेळ करायला हवा असे मत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केले. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर मात केली.

पाचपैकी दोन सामन्यात मुंबई इंडियन्सला रिकी पाँटिंग , सचिन तेंडुलकर यांनी अर्धशतकी सलामी करून दिली आहे. यापूर्वीच्या सामन्यात तीनदा मुंबई इंडियन्सने पहिल्याच षटकात विकेट गमावली आहे. त्यामुळे संघावर दबाव येत आहे. यावेळी बोलताना पाँटिंग म्हणाला , ‘ दोघांनीही चांगला खेळ केलेला नाही. कामगिरीत सातत्य राखायचे असेल तर संघातील प्रत्येक खेळाडूला चांगला खेळ करावा लागेल. आमच्या दोघांचीही कामगिरी मनाजोगती झालेली नाही. मला स्वतःला मोठ्या अपेक्षा होत्या पण सुरूवातीला तरी मला अपेक्षेनुसार खेळ करता आलेला नाही.’

पाच सामन्यात पाँटिंगने केवळ ५२ धावा केल्या असून सचिनने ६९ धावा केल्या आहेत .
फलंदाजी , गोलंदाजी , क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत राजस्थानने आमच्यापेक्षा सरस कामगिरी केली आहे. खेळपट्टी ठणठणीत होती आणि राजस्थान रॉयल्सने चांगला खेळ केल व चांगली धावसंख्या उभारली. त्यांनी आमच्यावर मात केली असे पाँटिंगने स्पष्ट केले.

Leave a Comment