दुष्काळी भागात निंबोणीला ‘सलाईन’

सोलापूर: दुष्काळामुळे बळीराजाची उरलीसुरलेली पिकंही करपून जात आहेत. सोलापुरातल्या ११ तालुक्यात दुष्काळाची अशी भीषण दाहकता आहे. शेतकर्‍यांनी तर गावातून कधीच चारा छावणीवर आसरा घेतला आहे.

मात्र सोलापुरातल्या एका शेतकर्‍यानं यावर एक नामी शक्कल शोधून काढली आहे. सुरेश साठे या शेतकर्‍यानं आपल्या शेतात असलेल्या थोड्याबहूत पाण्याचं योग्य नियोजन करून निंबोणीची बाग जपण्याचा प्रयत्न केला. ड्रिपसाठी खर्च करण्यासाठी पैसे नसल्यानं त्यानं चक्क सलाईनच्या बाटल्यांचा वापर करून आपल्या शेतातली शंभर निबोणीची रोपं जगवली.

त्यांनी केलेल्या या अभिनव प्रयोगाला दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी चांगलीच दाद दिली आहे. सुरेश साठे या शेतकर्‍याप्रमाणं अभिनव पद्धतीनं रोपं जगवली तर दुष्काळातही पालवी फुलवण्यास मदत होऊ शकते.

Leave a Comment