ब्रेक अपनंतरही केले एकत्रित काम

बॉलीवुडमध्ये प्रेम आणी ब्रेक अप आता काही नवीन राहिले नाही. येथे किती तरी जोडी तयार होतात आणी तुटतात देखील. मात्र गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडमध्ये नवीन ट्रेंड आला आहे.काही जन ब्रेकअप नंतर देखील सिनेमात एकत्रित काम करीत आहेत. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम आता सिनेमावर होत नाही. अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोन ही जोडी आता झाले गेले विसरून कामाला लागली आहे.

त्यानंतर अभिनेत्री करीना आणि शाहिद कपूर यांच्यातील प्रेम काहणीपण काही दिवसानंतर तुटली होती.पण या जोडीने पण त्याचा करियरवर परिणाम होऊ दिला नाही. ‘जब वी मेट’ या सिनेमानंतर दोघातील संबध ताणले गेले मात्र त्यानंतर दोघानी शानदार परफॉर्मेंस करत दोन सुपरहिट फिल्म तयार केली.दुसरीकडे सलमान आणिकटरीना यांच्यातील जवळीकता सर्वांना माहिती होती. त्यांनी पण ब्रेकअप नंतर ‘एक था टायगर’ हा हिट सिनेमा केला.

दुसरीकडे शाहिद कपूर आणी प्रियंका चोप्रा दोघे जरी वेगळे झाले असले तरी त्यांनी एकत्रित काम केले. ‘बैंड बाजा बारात’ या सिनेमात रणबीर आणि अनुष्का यांनी पण ‘रिकी बहल वर्सेस लेडीज’ या सिनेमात काम केले आहे.अभिनेता रेखा आणि अमिताभयांनी पण ब्रेकअप नंतर काम केले आहे.

Leave a Comment