राज ठाकरे उत्तम नकलाकार-जयंत पाटील

सांगली – काही दिवसापासून राज ठाकरे यांनी एक कला आत्मसात केली आहे. त्यांच्या कलेचा मी आदर करतो. ते उत्तम नकलाकर आहेत. येत्या काळात त्यांनी तेच काम करत नागरिकाची करमणूक करावी, नवनिर्माणचे काम जनता त्यांच्याकडे कधीच सोपविणार नाही, असे टीकास्त्र ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी सांगली येथील कार्यक्रमप्रसंगी सोडले.

जयंत पाटील म्हणाले, ‘नकला करून लोकांची करमणूक होते , मात्र त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. राज ठाकरे सभातून केवळ राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करीत आहेत. त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत . काँग्रेसबद्दल मात्र ब्र शब्द देखील काढायला ते तयार नाहीत. राष्ट्रवादीने आतापर्यंत जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते मार्गी लावले आहेत. राज्यतील जनता खूप हुशार आहे. त्यांना चांगले काय आहे समजते. म्हणूनच ती नकलाकाराला नवनिर्माणाची संधीदेइल असे वाटत नाही.’

‘मी राज्याचा गृहमंत्री असताना एकदा ते मला मुंबईमध्ये भेटण्यासाठी आले होते. झोपडपट्टी व वाहतुकीबाबत त्यांनी अर्धा तास चर्चा केली. हे प्रश्न मार्गी लागणार नाहीत हे मला माहीत होते. म्हणून मी शांतपणे त्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी मी जे काही थोडे बोललो त्यांची राज यांनी नक्कल केली .मला त्याचे अजिबात वाईट वाटले नाही. नक्कल उत्तम केली त्याबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे, ‘असे पाटील म्हणाले.

Leave a Comment