आता राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्हीची नजर

मुंबई: राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले.

अपघात रोखण्यासाठी आणि अपघातातील जखमींवर त्वरीत उपचार व्हावेत; यासाठी महामार्गावरच्या पथदिव्यांवर सीसीटीव्ही बसवण्याचा आदेश न्यायमूर्ती अजय खानविलकर यांनी एका याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान दिला आहे. तसंच यापुढं हायवेची बांधणी करताना किंवा दुरुस्ती करताना सीसीटीव्ही बसवण्याचा मुद्दाही समाविष्ट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सीसीटीव्ही बसवल्यामुळं अतिवेगानं जाणा-या गाड्यांवरही नियत्रंण ठेवता येणार असल्याने आपोआपच अपघातांची संख्याही कमी होईल. अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली आहे.

Leave a Comment