ऐश्वर्या झाली चिंतीत

गेल्या काही दिवसापासून महिला आणि लहान मुलीवरील लैंगिक अत्याचारच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण देश चिंतित आहे. या सर्व गुन्हेगारी प्रकारची चिंता अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला सुद्धा आहे. ऐश्वर्या, ही एक महिला आहे आणि तिला एक लहान मुलगी असल्याने तिच्या चिंतेत भरच पडली आहे.

नुकतीच नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. यावेळी मनमोकळे करताना ऐश्वर्या म्हणाली, ‘ काही दिवसात महिला आणि लहान मुलीवरील लैंगिक अत्याचारच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा स्वरूपाचे गुन्हे करणा-याचा खूप राग येतो. असे प्रकारचे गुन्हे करणा-याच्या बाबतीत काही तरी वेगळा विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी वेळप्रसंगी कायद्यात बदल करून त्यांना कडक शिक्षा करण्यासाठी पावले उचलावीत.’

अभिनेती ऐश्वर्याच्या मते महिला आणि लहान मुलीवरील लैंगिक अत्याचार करणा-याला पोलिसांनी त्वरित कडक शिक्षा करायला हवी. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे करण्याचे धाडस कोणी करणार नाही. त्यासोबतच महिलांना सार्वजनिक ठिकानी वावरत असताना कसलीच भीती वाटणार नाही. देशातील महिलाना घराबाहेर पडल्यानंतर सुरक्षित वाटयला हवे असे वातावरण निर्मिती करण्याची गरज आहे.

Leave a Comment