अजय-रोहितच्या दोस्तीत दरार

दिग्दर्शक रोहित शेट्‍टीसोबत सध्या अभिनेता शाहरुख खान भलताच खुश दिसत आहे. अभिनेता-निर्माताची ही जोड़ी ‘चेन्नई एक्सप्रेस’ नंतर थांबेल असे सर्वानाच वाटत होते, मात्र घडले वेगळेच आहे. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार रोहित शेट्‍टीने दोन स्क्रिप्ट तयार ठेवल्या आहेत. त्यासाठी रोहित अजय देवगनला सोबत घेऊन हे दोने सिनेमे करणार होता. मात्र गेल्या काही दिवसपासून रोहितने त्याचा निर्णय बदलला असून या प्रोजेक्ट शाहरुखला सोबत घॆउन पूर्ण करण्याचा विचार तो करीत आहे.

शाहरुखला हे दोन्हीपण प्रोजेक्ट पसंत पडले आहेत. रोहितला पण अभिनेता शाहरुखला गेहून हा सिनेमा केला तर खुप चालेल असे वाटते. येत्या काळात जर दोघातील संबध जर असेच मधुर राहिले तर सर्व काही ठीकठाक चालणार असून लवकरच या दोन्ही प्रोजेक्टचे काम सुरु होईल. तसे पशिएल तर पूर्वी रोहितने अजय देवगनला सोबत घेऊन ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिर्टन्स’, ‘बोल बच्चन’ सारख्या सिनेमाची निर्मिती केली आहे. एवढेच नव्हे तर रोहित आणि अजय देवगन चांगले दोस्त आहेत. रोहितने अजयकडून परवानगी मिळाल्यानंतरच शाहरुखला ‘चेन्नई एक्सप्रेस’ मध्ये घेतले होते. मात्र गेल्या काही दिवसापासून रोहितने ग्रुप बदलला आहे.

बॉलीवुडचा बादशाह शाहरुख व रोहित शेट्टीच्या भागिदारीमुळे अजय देवगन आता खूपच मागे पडला आहे. असे घडले तर आगमी काळात अजय देवगनच्या हातातून रोहित सारखा एक टैलेंटेड दिग्दर्शक निघून जाणार आहे.

Leave a Comment