
मुंबई: मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळात काँग्रेसच्या वाट्याच्या काही जागा अद्याप शिल्लक असल्याने त्या भरण्यासाठी हायकमांडने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांतच मुख्यमंत्री नव्या मंत्र्यांच्या नावांची निश्चिती करतील असे समजते.
