सांगली – मंत्र्यांनी दुष्काळी भागात दौरे काढून काय साधले आहे; ना दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाला ना आधार; अशी टीका करून राजकीय नेते आणि मंत्र्यांनी केलेले दुष्काळी दौरे हे भंपकपणा आहे; असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केला.
राज ठाकरे आज सांगली दौर्यावर आहेत. दुष्काळाबाबत सरकावर जोरदार हल्लाबोल राज यांनी केला. दुष्काळाचे सरकारला काहीएक देणं घेणं नाही. केवळ दौरे काढण्यात मंत्री मग्न आहेत. मंत्री आणि पुढार्यांच्या दौर्याने काय मिळाले तुम्हाला; असा संवाल राज यांनी दुष्काळग्रस्तांना केला.