प्रतिष्ठेसाठी कांगारुना हरवावे लागणार- सिद्धू

गेल्या काही दिवसापासूनच्या सुमार कामगिरीमुळे क्रमवारीत टीम इंडियाची घसरण अव्वल स्थानावरून सहाव्या क्रमांकावर झाली आहे. आगामी काळात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असलेली ही कसोटी मालिका टीम इंडियासाठी अग्निपरीक्षाच ठरणार आहे. टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमधील प्रतिष्ठा टिकवून ठेवन्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करावी लागेल, असे मत क्रिकेटपटू व समालोचक नवज्योत सिद्धू यांनी व्यक्त केले.

याबाबत अधिक बोलताना सिद्धू म्हणाला, ‘ टीम इंडियासाठी बांगलादेश व दुस-या दुय्यम टीमला हरवण्यापेक्षा ऑस्ट्रेलियाचा पराभव करणे आवश्यक आहे. वर्ल्डकपनंतर दहा कसोटीत पराभूत होणे हे कोणत्याही टीमसाठी लाजिरवाणी बाब आहे. हरणारी टीम जर क्रमवारीत अव्वल स्थानी असेल तर हा पराभव अधिक बोचरा ठरतो.’

टीम इंडियाचा इंग्लंडने २७ वर्षांनंतर घरच्या मैदानावर हरवले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून भारतीय टीम ‘घर में शेर’ राहिलेली नाही, असे या पराभवामुळे अनेकांना वाटत आहे. गेल्या कशी दिवसापासून टीम इंडियाला अनुभवी खेळाडूंची उणीव भासत असल्याचे सिद्धू यांनी नमूद केले.

Leave a Comment