आमिर उतरला व्यसनमुक्तीच्या अभिनयात

टीवी शो “सत्यमेव जयते” च्या माध्यमातून समाजामध्ये जागरूकता निर्माण करणारा मिस्टर पर्फेक्टनिस्ट आमिर खान आता महिलाच्या व्यसनमुक्तीच्या कामात उतरला आहे. या क्षेत्रात काम करणा-या संस्थच्या समर्थनाच्याबाबत तो उतरला आहे. आमिरच्या मते महिलाना व्यसनमुक्तीच्या बाबतीत स्पष्ट रहायला हवे.

एका प्रेस कान्फ्रेंसवेळी बोलताना आमिर म्हणाला, ‘ इंडियामध्ये खुपच जटिल स्थिती आहे. या ठिकाणी महिला दारू पीत नाहीत. मात्र ही समस्या दिवसेदिवस उग्र रूप धारण करीत आहे. या ठिकाणी महिलाचा दारु पिण्याचा मुद्दा आधुनिकतेशी जोडलेला आहे. दारू पिण्याची बाब सार्वजनिक करण्यास काही महिला घाबरतात.’

आमिरच्या मते महिलाना व्यसनमुक्तीच्या कामासाठी वेळ लागणार आहे. हा एक संघर्ष ठरणार आहे. आतापर्यंत ही महिलाच्या व्यसनमुक्तीची चळवळ पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही. त्यामुळे आता हे चळवळ पुढे घेऊन जाण्यचा प्रयत्न मी करणार असल्याचे आमिरने यावेळी स्पष्ट केले.

Leave a Comment