भरधाव इंडिकाने सहा महिलांना चिरडले

मुंबई दि.२२- मंगळवारी सकाळी पायी फिरायला चाललेल्या महिलांना भरधाव वेगाने आलेल्या इंडिकाने धडक दिल्याची घटना अंधेरीतील सिप्स भागात घडली असून यात दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत. अन्य चौघीजणी गंभीर जखमी झाल्या आहेत व त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार २२ ते २७ वयोगटातील या महिला दररोज प्रमाणे पायी फिरण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. त्याचवेळी रस्त्यावरून भरधाव वेगाने आलेल्या गाडीने त्यांना धडक दिली. त्यात संगीता आणि रेखा या नावाच्या दोन महिला जागीच ठार झाल्या. बाकीच्या जखमी महिलांना पादचार्यां नीच उचलून रूग्णालयात दाखल केले. त्यांची ओळख सकाळपर्यंत पटलेली नव्हती.

अपघाताचे वृत्त समजताच पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी कारचालक प्रवीणकुमार कनोजिया याला ताब्यात घेतले असल्याचे समजते. पुढील तपास पोलिस करत असून कार कोणाच्या मालकीची आहे याचाही तपास सुरू आहे.

Leave a Comment