सत्य घटनेवरील सिनेमा घेऊन येतोय अक्षय

आगामी काळात एका सत्य घटनेवर आधारित असलेला सिनेमा अक्षय कुमार घेऊन येत आहे. ब-याच दिवसानंतर एक सत्य घटनेवर आधारित असलेल्या सिनेमात अक्की काम करणार असल्याने सर्वांची उत्सुकता वाढली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वी ‘ ए वेड्नेस्डे’ सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘स्पेशल छब्बीस’ हा एक ऐतिहासिक सिनेमा आहे. या सिनेमात अक्षय कुमार, काजल अग्रवाल, जिमी शेरगिल, मनोज बाजपेयी आणि अनुपम खेरने काम केले आहे. या सिनेमाची पृष्ठभूमि १९८० वर आधारित आहे.

याबाबत बोलताना अक्षय कुमार म्हणाला, ‘ हा एक महत्वपूर्ण सिनेमा आहे. त्यामुळे हा सिनेमा सर्वाना आवडेल असाच आहे. मला सुद्धा हा सिनेमा खुपच आवडला. मी या सिनेमाशी संबधित असल्याने मला त्याचा गर्व वाटतो. एक्ट्रेस काजल ही सुन्दर तर आहेच त्याशिवाय टैलेंटेड आणि प्रोफेशनल देखिल आहे. ती तिच्या रोलमध्ये पूर्णपणे फिट बसली आहे. तिच्या सोबत माझी बॉडिंग चांगली जमली आहे. तिच्या सोबत काम करताना मला खूपच बरे वाटले.’

या सिनेमासाठी दिग्दर्शक नीरजने सर्वप्रकारचा होमवर्क केला आहे. तसे पहिले तर निरज वर्षभरात तीन ते चार सिनेमे करीत आहे. ए वेडनेस्डे या सिनेमानंतर नीरजचा हा दुसरा सिनेमा आहे. त्यामुळे त्याने या सिनेमासाठी चांगले होमवर्क केले आहे. त्यामुळे हा सिनेमा हिट ठरेल असे वाटत आहेत.

Leave a Comment