शाहरुखला घाबरला संजय

दिग्दर्शक संजय लीला भन्सालीने त्याचा ‘रामलीला’ हा सिनेमा दस-याच्या मुहुर्तावर रिलीज करण्याचे ठरविले आहे. मात्र ही तारीख शाहरुखने त्याच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’साठीही बुक केली होती. दूध पोळल्यानंतर माणूस ताकसुद्धा फुंकून पितो. यापूर्वीच संजयने ‘सांवरिया’ आणि ‘ओम शांति ओम’ हे सिनेमे रिलीज केले त्यावेळेस जबरदस्त टक्कर झाली होती. त्यानंतर ‘देवदास’ सारखा हिट सिनेमा देणा-या टीममध्ये वाद झाला होता.

त्यामुळेच संजयने असा वाद टाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संजयने ‘रामलीला’च्या प्रदर्शनासाठी २९ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे. तसे पहिले तर ‘क्रिष-३’ हा सिनेमा थोडा उशिरा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे भन्सालीचा हा निर्णय थोडा गोंधळात टकणारा आहे. संजयच्या टीमला मात्र ‘राम लीला’बद्दल खूपच आत्मविश्वास वाटतो आहे.

या सिनेमासाठी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणने खूपच मेहनत घेतली आहे. बॉलिवूडच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुखने ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या प्रदर्शनासाठी आतापर्यत तारीख निश्चित केलेली नाही. मात्र दस-याच्या महूर्तावर हा चित्रपट रिलीज करण्याचा त्याचा विचार आहे. त्यामुळेच संजयने सावधानपणे ‘रामलीला’च्या प्रदर्शनाची तारीख पहिल्यांदा जाहीर केली आहे.

Leave a Comment