एच.एन. दुबे यांनी अभिनेता अजय देवगणच्या ‘बोल बच्चन’ या सिनेमातील एका डायलॉगवर आक्षेप घेतला आहे. त्यासाठी दुबे यांनी कोर्टात धाव घेतली असून दहा कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. याबाबत निर्माता अजय देवगन सोबतच दिग्दशक रोहित शेट्टी, नीरज वोरा, डायलॉग राइटर साजिद-फरहाद आणि प्रोड्यूसर धिल्लिन मेहता यांनाही नोटीस बजावली आहे.
दुबे यांनी सिनेमातील एका डायलॉगवर आक्षेप घेतला असून त्यामध्ये म्हटले आहे की, ‘चौबेजी मुछैय्या आणि दुबेजी नचनिया’ या सिनेमात अभिनेता अभिषेक बच्चनचा डबल रोल आहे. एकाला मिशी आहे तर दुस-याला मिशी नाही. या सिनेमात दोघातील फरक सांगण्यासाठी अजय देवगनला (पृथ्वीराज) नीरज वोरा (माखन) हा डायलॉग म्हणतो.
दुबेच्या मते, यामुळे विशेष्ट समाज अपमानित झाला आहे. या सिनेमात मुद्दाम हा डायलॉग ठेवला आहे. या सिनेमात कोणच चौबेजी नाही अथवा दुबेजीही नाही.चौबे आणि दुबे हे भारतातील प्रतिष्ठित आडनावे आहेत. ज्यांनी हा प्रकार केला ते पण भारतामधील रहिवाशी आहेत. तरीपण याबाबत काहीच दक्षता घेण्यात आलेली नाही. या सर्व प्रकारामुळे आपल्या समाजाची मानहानी झाली असल्याचे म्हटले आहे. अजय देवगणला उत्तर देण्यासाठी १५ दिवस वेळ दिला आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास दुबे दहा कोटीचा दावा ते दाखल करणार आहेत.