सूर्यास्तानंतर महिलांना अटक नाही

सूर्यास्तानंतर एका महिलेला अटक केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट पोलीस आयुत्त आणि नगर पोलीस आयुत्तना चांगलेच फैलावर घेतले आहे. तसेच सूर्यास्तानंतर आणि सूर्योद्यापूर्वी कोणत्याही महिलेला अटक करता येणार नाही, असे आदेशच उच्च न्यायालयाने पोलिसांना दिलेत.

न्यायमूर्ती ए.एस. ओका आणि न्यायमूर्ती शिंदे यांच्या खंडपीठाने महाराष्टच्या पोलीस आयुत्त* आणि नगर पोलीस आयुत्तना दोन आठवड्यांच्या आत तमाम पोलीस वर्गाला यासंबंधी जागृत करण्याचे आदेश दिलेत. कलम ६४(४)मध्ये अपरिहार्य परिस्थितीसोडून अन्य कोणत्याही गुन्ह्यामध्य कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर आणि सूर्योद्यापूर्वी अटक करण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. पोलिसांना सूर्यास्तानंतर आणि सूर्योद्यापूर्वी एखाद्या महिलेला अटक करायची असेल तर त्यासाठी त्यांना न्यायिक मॅजिस्टटकडून पूर्वसंमती घेणे आवश्यक असेल.

न्यायालयाने हे आदेश भारती खंदहार यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निर्णय देताना दिलेत. भारतीला अलाहाबाद न्यायालयाकडून जारी करण्यात आलेल्या अजामीनपात्र वारंटवरून माटुंगा पोलीसांनी अटक केली होती. १३ जून २००७ रोजी पोलीस उपनिरीक्षक मारुती जाधव यांनी भारतीला अटक केली होती.

Leave a Comment