मुंबई: सामाजिक विषयावरील वेगळे चित्रपट देणारे विख्यात दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ‘सत्याग्रह’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून त्यात अण्णा हजारेंची भूमिका अमिताभ बच्चन; तर अरविंद केजरीवाल यांची भूमिका अजय देवगण करीत आहेत. टीम अण्णाने भ्रष्टाचाराविरोधात केलेल्या आंदोलनाचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.
हा चित्रपट कोणत्या विशिष्ट घटनेवर अवलंबून नाही. मात्र सद्य राजकीय स्थितीचे दर्शन या चित्रपटातून घडणार आहे. सध्या सुरू असलेले घोटाळे, भ्रष्टाचार अणि त्याच्या विरोधात उभारण्यात आलेला लढा; हे सारे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे; अशी माहिती झ यांनी दिली. मात्र या चित्रपटच शेवट काय असेल; हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
जानेवारी महिन्यात या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार आहे.