केवळ ६०० रुपयात उदरनिर्वाह शक्यः शीला दिक्षित

नवी दिल्ली: महागाईने सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले असतानाच दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी जखमेवर मीठ चोळणारे विधान केले आहे. केवळ ६०० रुपयात सामान्य गरीब माणसाचा महिन्याभराचा उदरनिर्वाह चालू शकतो असा दावा दीक्षित यांनी केला आहे.

अन्न श्री योजनेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना दीक्षित म्हणाल्या की सामान्य गरीब कुटुंबाला दोन वेळच्या जेवणासाठी दरमहा ६०० रुपयाचे अनुदान पुरेसे आहे. विशेष म्हणजे ‘आम आदमी’च्या काळजीची भक्ष करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत दीक्षित यांनी हे विधान केले आहे.

दिल्ली सरकारने अन्न श्री योजना सुरू केली असून या योजनेनुसार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलेच्या बेनक खात्यात ६०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. सुमारे २५ लाख जणांना या योजनेचा लाभ होणार आहे.

Leave a Comment