पाकिस्तान संघाचा भारत दौरा नको- एहसान मणी

कराची: भारत आणि पाकिस्तानातील वैमनस्य लक्षात घेता भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा करू नये; असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष एहसान मणी यांनी व्यक्त केले आहे. भारताच्या दौर्यामुळे पाक क्रिकेट संघटनेला एक छदामही मिळणार नसून भारतीय क्रिकेट संघटनेच्या तिजोरीत सुमारे; १०० कोटी डॉलर्स जमा होतील; असेही मणी यांना वाटते.

डिसेंबर- जानेवारी महिन्यात पाक क्रिकेट संघ भारताच्या दौर्यावर येत आहे. या दौर्यात भारत पाकिस्तान संघात ३ एकदिवसीय आणि २ टी-२० सामने होणार आहेत. या दौर्याला मणी यांचा विरोध आहे.

हा दौरा करण्याचा निर्णय राजकीय दृष्टीकोनातून घेण्यात आला असेल; तर या दौर्याच्या कार्यक्रमात बदल होणार नाही याबाबत भारताने खात्री करून घ्यावी; असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Leave a Comment