अजित पवारांचा राजीनामा हे नाटकंच: केजरीवाल

सांगली: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा, सिंचन श्वेतपत्रिका आणि पुन्हा मंत्रिमंडळात समावेश हे सारे नाटक असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विजय मेळाव्यात उपस्थित राहण्यासाठी केजरीवाल सांगलीत आले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवारांवर तोंडसुख घेतले. जे लोक भ्रष्टाचार करणार तेच चौकशी करणार. मग या चौकशीतून निष्पन्न तरी काय होणार असा सवाल करून केजरीवाल म्हणाले की; सिंचन श्वेत पत्रिका कशी काढायची, पवारांनी राजीनामा कधी द्यायचा आणि पुन्हा कधी यायचे हे सगळे ठरलेले होते.

सरकारने सिंचन घोटाळ्यावर काढलेली सवेत पत्रिका कोरीच आहे. त्यात काहीच नाही; अशी टीका करून केजरीवाल म्हणाले की; लोक मूर्ख आहेत. त्यांना काही कळत नाही; अशी सरकारची समजूत आहे. मात्र मतदार निवडणुकीत त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत.

Leave a Comment