स्क्रिप्टमुळे कोणी खलनायक होत नाही- अमीर

यशराज फिल्म्सच्या ‘धूम 3’ मध्ये अमीर खान विलनची भूमिका करीत आहे. तो विलनची भूमिका करीत असल्याने प्रसारमाध्यमाकडून अभिनेता आमिर खानवर आरोप झाले. या आरोपाचे खंडन करताना अमीर म्हणाला, समाजामधील नैतिक मुल्यामधील बदलामुळे स्क्रीनवरील चांगली आणि वाईट रेषा पुसली आहे. खलनायक हे समाजातून येतात केवळ स्क्रिप्टमुळे कोणी खलनायक ठरत नाही.

‘धूम’ आणि ‘धूम-२’ चे यश पाहून काही दिवसापूर्वीच ‘धूम-३’ची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमात आमिर निगेटिव रोल करीत असून तिच्या सोबत कैटरिना कैफ झळकणार आहे. या सिनेमाचे शूट पूर्ण झाले असून लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे समजते. याबाबत बोलतना आमिर म्हणाला की, ‘खलनायक हा सीन आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. आमच्याकडे स्क्रिप्टच्या मागणीनुसार आता छोटे अथवा मोठे खलनायक राहिले नाहीत. एक वेळ अशी होती की त्याकाळी विलन जास्त प्रमाणात दिसत होते. स्क्रीनवरील विलनच्या प्रोफाइलमध्ये बदल झाला आहे. त्याकाळी स्मगलर, अंडरव‌र्ल्ड, राजनीतिचा हिस्सा असलेले विलन दिसून येत होते. मात्र आता नैतिकतेत बदल झाला आहे.’

मी सध्या यशराज ग्रुपशी निगडीत सिनेनिर्मिती क्षेत्रात काम करीत आहे. धूमसीरीजचा हा सिनेमा मनोरंजक, आणि मस्तीने भरलेला आहे. मी ज्यावेळी पण धूमची थीम ट्यून ऐकतो त्यवेळी माझे पावले थिरकन्यास सुरुवात होते. विक्टरच्या स्क्रिप्ट करीत असल्याने मी सध्या खुष आहे. त्यासोबतच मी जय आणि अली सोबत स्क्रीन शेयर करीत असल्याचे आमिरने सांगितले.

‘धूम 3’ हा सिनेमा ‘क्रिसमस’ म्हणजेच २५ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. यामध्ये अमीर व कैटरिना शिवाय अभिषेक बच्चन आणी उदय चोप्रा दिसणार आहेत. ते यामध्ये जय आणि अलीचा रोल करीत आहेत.

Leave a Comment