राहुल गांधींनी केली पाच राज्ये निश्चित

नवी दिल्ली दि.२८ – राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली आगामी लोकसभा निवडणुकांसाठी स्थापण्यात आलेल्या निवडणूक समन्वय समितीने निवडणुकांत अधिक लक्ष केंद्रीत करण्याची पाच राज्ये निश्चित केली असून मध्यप्रदेश, ओडीशा, छत्तीसगढ, झारखंड आणि कर्नाटक राज्यांचा त्यात समावेश आहे. ओडिशा वगळता बाकी चारी राज्यात सध्या भाजपचे सरकार आहे तर ओडिशात बिजू जनता दलाचे सरकार आहे. या पाच राज्यात लोकसभेच्या ९३ सीटस आहेत.

याच समितीने आगामी लोकसभा निवडणूकांत उत्तरप्रदेशात सर्वाधिक जागा लढविण्याचाही निर्णय घेतला असून बिहारमध्ये लालू प्रसाद यांच्या राजदशी तर रामविलास पास्वान यांच्या लोकतांत्रिक जनता दलाशी युती करण्याचेही ठरविले असल्याचे समजते.वरील पाच राज्यातील मतदारसंघ आणि उमेदवार यांची यादी लवकरच तयार करण्यात येणार आहे.

Leave a Comment