भारताची दमदार सुरुवात

भारतीय क्रिकेट टीमने इंग्लंड विरुद्धच्या सरदार पटेल स्टेडियमवर खेळ्ल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार सुरुवात केली आहे. या पहिल्या टेस्ट मैचमध्ये टीम इंडियाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना बिन बाद १२० धावा केल्या होत्या. सलामीवीर गौतम गंभीर [२७] और वीरेंद्र सहवाग [७९] धावा काढून नाबाद होते. सेहवागने दमदार फलंदाजी करताना पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले आहे.

टीम इंडियाचा कप्तान महेंद्र सिंह धौनी इंग्लंड विरुद्धच्या हिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय उचित ठरवत गौतम गंभीर [२७] आणि वीरेंद्र सहवाग [७९] ने भारतीय संघाला शानदार सुरुवात करून दिली. त्या दोघांनी सुरुवाती पासून दमदार फलंदाजी करीत इंग्लंडच्या गोलंदाजावर दबाव आणला. त्याने भारतीय संघला चंगली सुरुवात करून दिल्याने बहरत या सामन्यात धावाचा डोंगर उभ करेल असे वाटते.

त्यापूर्वी भारतीय टीममधून ईशांत शर्मा आणि अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंहला वगळण्यात आले आहे. तिकडे इंग्लंडने त्याच्या टीममधून मोंटी पनेसरला वगळले. त्यांनी तीन जलदगती गोलदाजाना संधी दिली आहे. हे मैदान फिरकीला साथ देणारे असल्याने भारत पाहिल्यांदा फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारून इंग्लंडवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहे.