राखीचा दिग्विजयसिंगावर हल्लाबोल, ५० कोटी रुपयांचा ठोकला दावा

नवी दिल्ली,१४ नोव्हेंबर-खळबळजनक विधाने करुन कायम चर्चेत राहाणार्‍या राखी सावंतने स्वतःची तुलना अरविंद केजरीवाल यांच्याशी केली होती. त्यावरुन काँग्रेस नेते दिग्विजयसिंग यांनी तिचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर राखीनेही दिग्विजय सिंगावर शाब्दिक हल्ला केला.

राखीने मुंबईतील गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये दिग्विजयसिंगांविरोधात ५० कोटी रुपयांची मानहानीची तक्रार दाखल केली आहे. ती म्हणाली, ’महिलांचा अपमान करणार्‍या दिग्विजयसिंग यांना मी निक्कीच कोर्टात खेचणार आहे. त्यासंबंधी मी माझ्या वकीलांशी चर्चा करीत आहे. राजकीय नेत्यांनी अवमानकारक टिप्पणी करण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष्य दिले पाहिजे.’

राखी म्हणाली, ’एक नेते म्हणून दिग्विजयसिंग हे चांगले आहेत. त्यांची भाषणशैली उत्तम आहे. मला आजपर्यंत वाटायचे की, ते फार हुषार आणि समजदार आहेत. मात्र, त्यांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी अशा पद्धतीने माझा वापर कधीही होऊ देणार नाही.’

Leave a Comment