माजी क्रिकेटपटू व भाजपचा खासदार नवजोत सिंह सिद्धू रियलिटी शो ‘बिग बॉस’ मधून बाहेर पडला आहे. त्याने बाहेर पडत असताना कुठलीच प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. सिद्धूला भाजपचे बोलावणे आल्याने हा शो सोडून बाहेर पडावे लागले आहे ? असे असेल तर ‘बिग बॉस’ हा रियालिटी शो असल्याचा दावा करीत असेल तर त्यांचा हा दावा ‘फेक’ आहे ? शुक्रवारी प्रसारित झालेल्या शोच्या प्रोमोमध्ये सिद्धू बाहेर पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सिद्धू बाहेर; ‘बिग बॉस’ ची रियालिटी संशयास्पद ?
काही दिवसापूर्वीच सिद्धूची पत्नी नवजोत कौरने गुजरातमधील निवडणूकप्रचारासाठी पक्षाच्या आदेशानुसार तो ‘बिग बॉस’ मधून बाहेर पडणार असल्याचे म्हटले होते. त्यांनी एक- दोन दिवसात सिद्धू शो मधून बाहेर येणार असल्याचे स्पष्ट केले होते. दुसरीकडे मात्र भाजपने मात्र सिद्धूला शो मधून बाहेर पडण्याचे आदेश दिले नसल्याचे म्हटले आहे.
मात्र चैनलने सिद्धूच्या पत्नीने केलेल्या मागणीनुसार पार्टीची जबाबदारी त्याच्यावर असल्याने सिद्धूला शोच्या बाहेर पडावे लागत असल्याचे म्हटले आहे. मात्र रियलिटी शो मध्ये सहभागी झालेल्याला अशाप्रकारे बाहेर पडावे लागले तर शोच्या ‘रियल’ असण्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नॉमिनेट करण्यासाठी प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया पूर्ण न केल्यास बाहेर पडता येत नाही. या आठवड्याची ही प्रक्रिया पार पडली आहे. ‘बिग बॉस’ मधून शुक्रवारी संपत पाल बाहेर पडली आहे. त्यामुळे बिग बॉस’ च्या या रियालिटी संशय व्यक्त केला जात आहे.
सिद्धू अचानक ‘बिग बॉस’ मधून बाहेर पडण्यामागे भाजपचा हात असल्याचे समजते. या शोमध्ये त्यांच्या पक्षाचे खासदार सिद्धू यांची बदनामी होता असल्यच्या कारणावरून त्याला बाहेर पडण्यास सांगितले असल्याचे समजते. त्याशिवाय त्यांनी क्रिकेटच्या बाबतीत केलेला खुलासा व या शोमधील प्रतिस्पर्धी सपना भावनानी सोबत सिद्धूची वाढलेली जवळीकता पार्टीला आवडली नसल्याचे समजते. गुजरातचे मुख्यमंत्री नरेद्र मोदी यांच्या सोबत सिद्धूचे चांगले संबध असल्याने तो निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतारणार असल्याचे समजते.