डॉ.बंग यांच्या मुखातून संघाची मुक्ताफळे:नबाब मलिक

मुंबई: महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र झाल्याचे डॉ. अभय बंग यांचे स्वत:चे विचार नाहीत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या तोंडातून ही मुक्ताफळे उधळली आहेत; अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी केली आहे.

महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र झाले असून त्याचे सत्तापीठ बारामतीत आहे; अशा टीका ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बंग यांनी पुण्यात एका कार्यक्रमात केली.

मलिक यांनी डॉ. बंग यांच्या विधानावर कडवट टीका केली. बारामती ही साबरमतीच्या विचारावर चालते. तिथे मद्याला स्थान नाही; असे सांगून मलिक म्हणाले की; डॉ. बंग हे संघविचाराशी संबंधित असून त्यांच्या मुखातून संघच हे बोलला आहे. डॉ. बंग हे बकाल मानसिकतेचे असल्याची टीकाही त्यांनी केली.

Leave a Comment