
नवी दिल्ली: तिकीटाचा काळा बाजार, गैरवापर रोखण्याबरोबरच रेल्वे प्रवास सुरक्षित करण्याच्या दृष्टीने सर्वच रेल्वे प्रवाशांकडे स्वत:चे छायाचित्र असलेले ओळखपत्र असणे आवश्यक करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. हा निर्णय दि. १ डिसेंबरपासून सर्वांना लागू असेल; अशी माहिती रेल्वे प्रवक्त्याने दिली.
