जरी बॉलीवूडमध्ये खानच्या नावाचा धबधबा असला तरी करीना असे काही मानत नाही. कोणी तिला जर आता सैफ अली खान सोबत लग्न केल्याने तिला करीना खान म्हणाले तर हे तिला आवडणार नाही. त्यामुळेच तिने लग्नानंतर ही खान ऐवजी कपूरच आडनाव कॅरी करायचे ठरविले आहे. करीनाचा लग्नानंतर ही नाव न बदलान्यचा हा नवा ट्रेंड सध्या चांगलाच पॉपुलर होतो असे दिसते आहे.
तसे पहिले तर लग्न जर भारतात झाले असेल तर खूप काही बदलते. मुलीच्या बाबतीत तर बरेच बदल घडत असतात. आगामी काळात डायरेक्टर रीमा कागजी हिचा ‘तलाश’ हा सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमातील क्रेडीट लाएन मध्ये अजून तिचे नाव करीना कपूर असेच कायम ठेवण्यात आले आहे. लग्नाच्यापूर्वी करीना कपूर ही इस्लाम धर्म स्वीकारून तिच्या आडनावात बदल करेल असे वाटत होते. मात्र तसा बदल बेबोने केला नाही. मन्सूर आली पतोडी सोबतच्या लग्नावेळी तिच्या सासूने म्हणजेच शर्मिला टागोरने नाव बदलून आएसा बेगम असे ठेवले होते. मात्र करीना असा काही बदल करेल असे सध्या तरी वाटत नाही.
करीनाचा हा नाव न बदलण्याचा ट्रेंड निश्चितच कौतुकासपद आहे. त्यामुळेच हा नाव न बदलण्याचा ट्रेंड मात्र आगामी काळात बॉलीवूडमध्ये पॉपुलर होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.