…अन् आमीर खान म्हणाला ’ओह माय गॉड’!

अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या ’ओह माय गॉड’ने अनपेक्षितरीत्या बॉक्स ऑफिसवर यश मिळवले आहे. प्रेक्षकांनी हा सिनेमा दुसर्‍या आठवड्यापासून डोक्यावर घेतला. मात्र या सिनेमामुळे आमीर खानवर ओह माय गॉड म्हणण्याची वेळ आली आहे. कारण सध्या आमिर खान करत असलेला ’पी.के.’ या राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमाचे कथानक अक्षय कुमारच्या ’ओह माय गॉड’च्या कथेच्या जवळ जाणारे असल्याचे सांगितले जात आहे. 

या सिनेमात देवभोळेपणावर आणि अंधश्रद्धाळूंच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. त्यामुळे हा सिनेमा सामान्य प्रेक्षकांना भलताच भावला. याशिवाय यातल्या देवाच्या नावाचा वापर करून पैसे उकळणार्‍या स्वामी, बाबा लोकांचा खरपूस समाचार घेतल्यामुळे बर्‍याच धार्मिक संस्थांनी त्यावर आक्षेप घेतला आणि सिनेमा वादग्रस्त ठरू लागला. यामुळे सिनेमाच्या प्रसिद्धीत आणखीनच भर पडली. आणि सिनेमा बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचू लागला.

ओह माय गॉड’ सिनेमामुळे जसे देवाधर्माच्या नावाने पैसे उकळणारे स्वामी, बाबा जसे घाबरले, त्यांच्याबरोबरच आणखी एक व्यक्ती घाबरली आहे.. ती व्यक्ती म्हणजे आमिर खान! हा सिनेमा पाहून आमिर खान घाबरण्याचे कारण म्हणजे सध्या आमिर खान करत असलेला सिनेमा ’पी.के.’ राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमाचे कथानक अक्षय कुमारच्या ’ओह माय गॉड’च्या कथेच्या जवळ जाणारे असल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच आमिर खानने ताबडतोब चित्रपटाचे लेखक राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी यांना ’पी.के.’ सिनेमाचे पुनर्लेखन करण्यास बसवले आहे.

या सिनेमामध्ये आमिर, राजकुमार हिरानी यांनी बरेच पैसे गुंतवल्यामुळे हा सिनेमा वेगळा असावा, याठी पुन्हा स्क्रिप्टचे लेखन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या सिनेमाचे शुटिंग पुढच्या वर्षी सुरू होणार आहे. या सिनेमात आमिरसोबत अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंग राजपुतही दिसणार आहेत. यापूर्वी ’कहानी’ सिनेमाच्या कथानकाशी साम्य असल्यामुळे आमिरने ’तलाश’ सिनेमाचे शुटिंग पुन्हा करायला लावून कथेत बदल करायला लावला होता.

 

Leave a Comment