दोन दिवसात सव्वाशे बांगला घुसखोर गजाआड

मुंबई: बांगलादेशी घुसखोरांचा उपद्रव केवळ सीमावर्ती ईशान्य भारतीय राज्यातच आहे; असे नाही तर मुंबईतही मोठ्या प्रमाणात बंगला घुसखोर असल्याची बाब मुंबई पोलिसांच्या धडक कारवाईने उघड खाली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी सव्वाशे बांगला घुसखोरांना अटक केली.

मुंबई शहर आणि प्रामुख्याने उपनगरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर शिरले असून ते येथेच ठाण मांडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना खबर्‍यांमार्फत मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी घाटकोपर आणि भायखळा या ठिकाणी छापे घालून मुंबईत बेकायदेशीर रीतीने राहणार्या १२६ घुसखोरांना केवळ २ दिवसात अटक केली.

मुंबई पोलिसांनी वर्षभरात एकूण ६४३ जणांना अटक केली आहे.

Leave a Comment