
बंगलोर: भारताची महत्वाकांक्षी मंगळ मोहीम सन २०१३च्या नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती इस्त्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बंगलोर: भारताची महत्वाकांक्षी मंगळ मोहीम सन २०१३च्या नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती इस्त्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पुढील वर्षी मंगळ पृथ्वीच्या जवळ येत असल्याने भारताची मोहीम २७ नोव्हेंबर २०१३ रोजी सुरू करण्याचा इस्त्रोचा प्रयत्न आहे. ही संधी साधता आली नाही तर पुन्हा पृथ्वी आणि मंगळ जवळ येण्यासाठी तब्बल २७ महिने प्रतीक्षा करावी लागेल; असे राधाकृष्णन यांनी सांगितले.
या मोहिमेला ४७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मोहिमेसाठी अत्याधुनिक असे पीएसएलव्ही प्रक्षेपक वापरले जाणार असून त्याद्वारे १.४ टनाचे यान मंगळाकडे रवाना करण्यात येईल. या मोहिमेमुळे भारत हा रशिया, अमेरिका, जपान, चीन आणि युरोप या स्वयविकसित तंत्रज्ञानाच्या आधारे ३०० हून अधिक दिवस अंतरीक्ष भ्रमण करू शकणार्या देशांच्या पंक्तीत समाविष्ट होणार आहे.
या मोहिमेद्वारे मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करण्याबरोबरच मंगळावर सजीवांच्या अस्तित्वाला उपयुक्त घटक आहेत काय; याचा अभ्यास करण्यात येणार आहे.