काँग्रेस, राष्ट्रवादीचे तू-तू; मैं-मैं

सोलापूर: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाराष्ट्रात सत्तेसाठी एकत्र असले तरीही प्रत्यक्षात एकमेकावर कुरघोडी करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. आता केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांनी सीएसटी हिंसाचाराबाबत केलेल्या परस्परविरोधी दाव्या- प्रतिदाव्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला आणखी एक निमित्त मिळणार आहे.

रझा अकादमीने आसामातील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी काढलेल्या मोर्चादरम्यान हिंसाचार घडण्याची शक्यता केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली होती. त्यांनी याबाबत पोलिसांना सतर्क केले होते. मात्र गुप्तचरांच्या या सूचनेकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळेच हा मोठा हिंसाचार घडून आल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. एक प्रकारे त्यांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या राज्याच्या गृह विभागाचेच वाभाडे काढले.

मात्र राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शिंदे यांच्या दाव्याला आव्हान दिले आहे. या हिंसाचाराच्या शक्यतेबाबत केंद्रीय गुप्तचरांकडून पोलिसांना अथवा गृह विभागाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही; असा दावा त्यांनी केला.

Leave a Comment