रणबीरची ‘बर्फी’ गोड असणार का ?

रणबीर कपूरचा ‘बर्फी’ हा सिनेमा सर्वापेक्षा जरा हटके आहे. यामधील रणबीरचा रोल सुद्धा थोडसा वेगळा आहे. त्याला बोलता पण येत नाही व ऐकता ही येत नाही अशा युवकाचा रोल तो करीत आहे. त्यामुळेच त्याचा हा रोल कितपत सर्वाना पसंत पडतो त्यावरच ‘बर्फी’ हा सिनेमा किती गोड आहे हे समजून येणार आहे.

या रोल बाबत बोलताना रणबीर कपूर म्हणाला, ‘या सिनेमा मधून मी शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या व्यक्तीची चेष्ट केली नसून मी त्यांची जबाबदारी ओळखून या सिनेमातील रोल केला आहे. त्यांच्या जीवनात केवळ दुख नसून सुख ही आहे याची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक फिलगुड सिनेमा असून अपंगाच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हा सिनेमा पहिल्यानंतर सर्वच्याच चेहऱ्यावर हास्य दिसेल. त्यामुळे प्रत्येकाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल.’

‘सावरियाँ’ सिनेमा पासून कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या रणबीर कपूरने आता पर्यंत बरेचसे हिट सिनेमा दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात येत असलेल्या ‘बर्फी’ या सिनेमात केवळ अॅक्टिंगच्या माध्यमातुन रणबीरला सर्व काही करून दाखवायचे असल्याने त्याचा कस लागणार आहे.

Leave a Comment