राज ठाकरेही बिहारी भैय्या- दिग्विजय सिंह

नवी दिल्ली: सतत आपल्या अकलेचे तारे तोडून वाद उभे करणारे काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ठाकरे कुटुंब हे मूळचे बिहारी असल्याचा जावई शोध लावला आहे. आपले मूळ लक्षात घेऊन राज ठाकरे यांनी बिहारी लोकांचा द्वेष करणे बंद करावे असा सल्लाही दिग्गीराजांनी दिला आहे.

मुंबई पोलिसांवर बिहारमध्ये कारवाई केल्यास बिहारी लोकांना मुंबईतून हाकलून देण्याचा इशारा राज यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांनी ठाकरे यांनाच ‘राज भैय्या’ बनवून टाकले आहे.

मुंबईत केवळ कोळी समाज मूळचा असून बाकी सगळे उपरे आहेत. ठाकरे कुटुंब मूळ बिहारचे असून दीडशे वर्षापूर्वी ते धारमार्गे महाराष्ट्रात आले; असा शोध दिग्विजय सिंह यांनी लावला आहे. त्यामुळे राज यांनी बिहारी लोकांचा द्वेष करू नये; असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Comment