
चेन्नई: कोट्यावधी रुपयांचे घोटाळे बाहेर येत असल्याने जनता कंटाळली असून देशात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व्यंकैय्या नायडू यांनी व्यक्त केले. सध्याच्या परिस्थितीत निवडणुका झाल्यास कॉंग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागेल; असेही ते म्हणाले.
