काँग्रेसने केली देशाची दुर्दशा: मोदी

अहमदाबाद: काँग्रेसने देशाची दुर्दशा केली असून यापुढे काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे; असे मत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी मेळाव्यात मोदी बोलत होते.

काँग्रेस गुजरातमध्ये परिवर्तनाची भाषा करीत आहे. प्रत्यक्षात काँग्रेस पक्षच दिशाहीन झाला आहे. त्यांच्यामुळे देशाची दुर्दशा झाली असून ते कसले परिवर्तन करणार; असा सवाल मोदी यांनी केला.

काँग्रेस असहिष्णू असल्याचा आरोपही मोदी यांनी केला. काँग्रेसला त्यांच्या विरोधात बोलणारे देशद्रोही वाटतात. त्यामुळे केंद्र सरकारचे वाभाडे काढणार्या पत्रकारांची ट्विटर अकाऊण्ट्स ते बंद करतात आणि कोंग्रेसच्या गैरप्रकारांना वाचा फोडणार्या टीव्ही -९ सारख्या वृत्त वाहिन्यांच्या प्रसारणाला बंदी घालतात; असा आरोपही त्यांनी केला.

Leave a Comment