भाजपशासित राज्यांबाबत केंद्राचा दुजाभाव: सिन्हा

नवी दिल्ली: केंद्र सरकार भारतीय जनता पक्षाची सरकारे असलेल्या राज्यांच्या विकासात अडथळे आणून भेदभाव करीत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केला.

भाजपाशासित सरकारांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीच्या समारोपानंतर सिन्हा पत्रकारांशी बोलत होते.

वास्तविक केंद्राने कोणताही भेदभाव न करता भाजपशासित राज्यांच्या विकासाला हातभार लावणे गरजेचे आहे. मात्र केंद्र सरकार या राज्यांच्या प्रगतीबाबत असूया बाळगून त्यांच्या प्रगतीत अडथळा आणत आहे; असा आरोप सिन्हा यांनी केला.

भ्रष्टाचार, अनिर्बंध भांडवलशाही आणि अधिकारांचे केंद्रीकरण हीच राज्यकर्त्यांनी केलेली विकासाची व्याख्या आहे; असा आरोपही सिन्हा यांनी केला.

Leave a Comment