
भारतीयांच्या हृदयात गंगा नदीचे नक्की काय स्थान आहे याचे वर्णन करणे अवघड आहे. स्वर्गीची गंगा भगीरथाने महत् प्रयत्नांनी भूलोकी आणली आणि या पुण्यसरितेने अवघे भारतवर्ष पावन केले. नदी ही जीवनदायिनी असतेच पण त्यातही गंगा ही केवळ जीवनदायिनी नाही तर त्यापेक्षाही अधिक कांहीतरी आहे. गंगेचे पाणी कितीही काळ साठविले तरी ते खराब होत नाही. म्हणूनच न परतीच्या प्रवासाला निघालेल्या आपल्या प्रियजनांच्या मुखात घालण्यासाठी गंगोदकाचा गडू बहुतेक हिंदू कुटुंबात देवघरात ठेवलेला असतो. भारतीयांचे गंगामातेशी असे वेगळेच भावबंध जोडलेले आहेत. हिमालयातील चारधाम यात्रेतील गंगोत्री हे स्थान म्हणूनच पाहायला हवे. श्रद्धावंतांनी भावापोटी पाहावे तर ज्यांची देवावर श्रद्धा नाही त्यांनी निसर्गसौदर्याच्या अनुभूतीसाठी गंगोत्रीला भेट द्यावी.

हृषिकेशपासून गंगोत्रीला जाता येते. उत्तरकाशीपासून ९९ किमीवर असलेले गंगोत्री समुद्रसपाटीपासून ३१०० मीटर उंचीवरचे ठिकाण आहे. उत्तरकाशी, तिलबाडा,





