‘खान वॉर’ चा लवकरच अंत ?

बॉलीवूडमधील खान त्रिकुटामधून विस्तव जात नाही हे सर्वाना माहित आहे. त्यातही सलमान व शाहरुख यांच्यातील संबध चांगलेच बिघडलेले आहेत. दोघेही नेहमीच एकमेकांवर कमेंट करण्यची एकही संधी सोडत नसत. एकमेकांना टोमणे मारण्याची त्यांची जुगलबंदी सर्वांचीच करमणूक करून गेली आहे. पण यापुढे ही मजा लुटता येणार नाही कारण सलमान व शाहरुख यांनी आपसातले मतभेद विसरून एकत्र येणार आहेत असे समजते.

सलमान व शाहरुख यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी सध्या कैतरीना कैफने पुढाकार घेतला आहे. कैतरीनाने याबाबत काही दिवसापूर्वी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले होते की, स्टार मंडळीत मतभेद होत असतात मात्र त्याकडे दुर्लक्ष करून कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आगामी काळात कैतरीनाच्या एका प्रोजेक्टमध्ये सलमान व शाहरुख एकत्रित येणार असल्याची चर्चा आहे. त्याबाबतीत कैतरीनाची दोघांसोबत चर्चाही झाली आहे. याबाबत कैतरीनाचे म्हणणे असे की ‘सलमान आणि शाहरुख त्यांच्या कामांत सध्या तरी बिझी आहेत. तेच जर वाद विसरून पुढे निघाले असतील तर आपण पण तो वाद विसरायला हवा.’

Leave a Comment