’मंगळावर अंतराळ यान पाठविणे हे भारतासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार’

पंतप्रधान मनमोहन मिंग यांनी लाल किल्यावर देशाच्या ६६ व्या स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून मंगळ आभियानाची (बुधवार) अधिकृत घोषणा केली. केंद्रिय मंत्रिमंडळाने ४ ऑगस्ट रोजी या अभियानाला मंजूरी दिली होती.

मंगळावर अंतराळ यान पाठविणे हे भारतासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचेही मनमोहन सिंग यांनी यावेळी बोलताना म्हटले.
मंगळावर यान पाठवणारा भारत हा सहावा देश असणार आहे. यामध्ये अमेरिका, रुस, यूरोप, जापान, आणि चीन या देशांचा देखील समावेश आहे.

चीन आणि जपान यांचे मंगळ अभियान अर्ध्यातूनच थांबवावे लागले होते. त्यामुळे भारताचे हे अभियान सफल झाल्यास मंगळावर यान पाठवणारा भारत आशियाखंडातील पहिला देश ठरणार आहे.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्त्रो) यांनी दिलेल्या माहितीनुसार या अभियानासाठी ४५० करोड एवढा खर्च येणार आहे. पुढील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात या अभियानाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

भारतीय अंतराळ यानाला मंगळाच्या कक्षेत पोहोचण्यासाठी ३०० दिवसांचा कालावधी लागणार आहे.