आग्रा, दि. ९ – मंगळवारी (ता. ७) रात्री स्टेट बँक ऑफ इंडियाचे ३० लाख रुपयांची रोकड जमा असलेले एटीएम मशिन जळाल्याची घटना घडली. ही घटना आग्रापासून २० किमी अंतरावर असलेल्या इत्मादपूर येथे घडली असून, अग्निशामन दलाला येण्यास उशीर झाल्याने सर्व पैशाचे नुकसान झाले.
या एटीएमच्या सुरक्षारक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, एटीएममधील वातानुकुलित यंत्रापासून आग लागण्यास सुरवात झाली. आग लागल्याचे समजताच लगेच पोलिसांना माहिती दिली. स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक राम किशोर यांनी सांगितले, की आग लागण्याच्या एक तास आगोदर एटीएममध्ये तीस लाख रुपयांची रोकड भरण्यात आली होती. आगीमुळे नुकसान झाल्याने एक आठवडा एटीएम केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.