सुशीलकुमार शिंदेंनी मागितली जया बच्चन यांची माफी

नवी दिल्ली, १० ऑगस्ट-संसदेचे पावसाळी अधिवेशन हे आता माफी अधिवेशन म्हणून ओळखले जाईल. कारण काल भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी माफी मागितली. तर आज हीच वेळ केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर आली.सभागृहात आसाममधल्या हिंसाचाराची चर्चा सुरु होती.

या भाषणात व्यत्यय आणणार्‍या जया बच्चन यांना सुशील कुमार यांनी हा फिल्मी विषय नाही, तर जनतेचा विषय आहे असे म्हणत टोमणा मारला.

सुशीलकुमार यांच्या विधानानंतर राज्यसभेत गोंधळ सुरु झाला. संतापलेल्या जयाबाई जोरजोरात माफीची मागणी करत होत्या. या मागणीला विरोधकांचीही साथ मिळाली.

अरुण जेटली यांनी गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि अखेर स्थिती निवळण्यासाठी गृहमंत्र्यांना माफी मागावीच लागली.

Leave a Comment